Friday, September 11, 2015

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या निमित्ताने… – भाऊ फाटक


२००३ च्या सुमाराचा हा लेख आहे. वाजपेयी पंतप्रधान होते. स्वा. सावरकरांचा पुतळा संसदेत लावण्यावरुन वादंग झाला होता. त्याचा संदर्भ या लेखाला आहे. इतिहास व ऐतिहासिक व्यक्तींचे मापन, विरोधकांकडे पाहायची आपली वृत्ती याबाबतचा उहापोह त्यात आहे. लेख जुना असला तरी सध्याच्या घटना व चर्चा लक्षात घेता काही नवे आयाम लक्षात घेण्याच्या दृष्टीने तो प्रासंगिक ठरावा.
लेखक भाऊ फाटक (१९१७-२००४) हे जुने कम्युनिस्ट नेते, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, शिक्षक नेते व शिक्षक आमदार, शालेय इतिहासाच्या क्रमिक पुस्तकांच्या लेखनातील भागिदार, लाल निशाण पक्षाचे नेते होते. अनेक सामाजिक-राजकीय चळवळींना चालना देण्यात त्यांचा सहभाग राहिला आहे.
भाऊ फाटक
स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांचे तैलचित्र संसद हॉलमध्ये लावायचे, यावरुन जी भवति न् भवति झाली त्यामुळे काही मुद्दे पुन्हा उपस्थित झाले आहेत. डाव्या कम्युनिस्टांच्या पुढाकाराने व इतरांच्या निरनिराळ्या कारणांमुळे मिळालेल्या सहकार्याने या अनावरणाला जो विरोध केला गेला तो अत्यंत गैर होता, हे स्पष्टपणे नमूद करुन पुढील मजकूर लिहीत आहे.
प्रारंभी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, संसद भवनात ज्यांची तैलचित्रे लागतात त्या व्यक्तींचे सगळे विचार संसदेतील प्रत्येक खासदाराला मान्य असतातच असे नाही. संसदेत विविध पक्षांचे खासदार निवडून येतात आणि प्रत्येक पक्ष हा कालमानाप्रमाणे बदलत असतो. त्यामुळे, हे राष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी आपापल्या परीने ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांबद्दल कृतज्ञ राहून स्मृती जपणे एवढाच तैलचित्र लावण्यामागचा उद्देश असतो. हा देश पारतंत्र्यातून मुक्त व्हावा यासाठी जे प्रसंगी प्राणांचे मोलही द्यायला तत्पर होते, त्यांत सावरकरांची गणना होते, ही गोष्ट सर्वांना मान्य करावीच लागेल. आणि म्हणूनच तैलचित्र लावणेबाबत जी कमिटी नेमली होती त्यांनी बहुधा सर्वसंमतीने चित्र लावायचा निर्णय घेतला असावा; आणि तो योग्यच होता. ज्या माणसाने ऐन तारुण्यात ५० वर्षांची शिक्षा झालेली असताना न्यायपीठाला उद्देशून ‘५० वर्षे तुमची सत्ता टिकली तर ना!’ असे उद्गार काढण्याचे अलौकिक धैर्य दाखविले, त्यांच्या तैलचित्राचे अनावरण हे कमिटीच्या एकमताच्या ठरावाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत इतमामाने पार पडायला हवे होते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. एखाद्या व्यक्तीशी मतभेद अथवा प्रसंगी टोकाचा विरोध असतानाही इतिहासातील तिच्या कामगिरीची योग्य कदर करण्याचे बाळकडू सामान्य जनता व खास करुन विविध पक्षांचे कार्यकर्ते यांच्या मनावर बिंबवायला हवे. ती संधी चुकली हे दुर्दैव. ही वृत्ती मुरली नाही तर त्या-त्या वेळचा जो सत्ताधारी पक्ष असेल व त्या-त्या काळचा जो पुढारी असेल त्याचेच तैलचित्र आणि ग्रंथ ठेवावेत अशी घातकी व असंस्कृत परंपरा सुरु होईल. एक जुना कम्युनिस्ट कार्यकर्ता (आता माझे वय ८६ वर्षे आहे.) या नात्याने मला कॉ. स्टालीन यांच्यावरील टीका व त्यांचे नाव इतिहासातून पूर्णपणे पुसून टाकण्याची केविलवाणी धडपड याची आठवण झाली. उद्या आपल्या देशात इंदिरा गांधींचे मापन करताना देशाचे एकत्व टिकविण्यासाठी त्यांनी जीवघेणा संघर्ष केला, बलिदान केले, याबाबतही कोणी प्रश्न उपस्थित करेल, अशी भीती वाटते. इतिहास असा पुसून टाकता येत नाही. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने आपला व्यवहार याबाबत वेगळा ठेवला आहे. कॉ. माओंच्या धोरणावर टीका करुन, त्यात बदल केले असताना चीनच्या उभारणीत त्यांनी केलेल्या योगदानाचे त्या पक्षाने अवमूल्यन केलेले नाही. सावरकरांच्या संदर्भात झालेल्या परवाच्या घटनेमुळे हा जुना प्रसंग आठवला. ही घातक प्रथा आपल्या देशात सुरु होऊ नये व कार्यकर्त्यांची वृत्ती योग्य राहावी, असे वाटते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारला माफीनामा लिहून दिला, असा एक आरोप यानिमित्ताने पुन्हा करण्यात आला आहे. कुठल्याही सरकारशी व्यवहार करण्याची रीत, पत्रव्यवहाराची भाषा ही कालमानाप्रमाणे ठरते. काँग्रेस संघटनेचे जेव्हा पहिले अधिवेशन भरले, तेव्हा ते संपताना महाराणी व्हिक्टोरियाचा ३ वेळा जयजयकार करण्यात आला होता. सावरकरांनी ज्या काळात ब्रिटिश सरकारला पत्र लिहिले तेव्हाचे राजकीय वातावरण कसे होते? संपूर्ण स्वातंत्र्याची मागणीही दृष्टिक्षेपात नव्हती. साम्राज्यांतर्गत स्वराज्य अशीच मागणी होती. अंदमानच्या जीवघेण्या तुरुंगवासात त्यांनी भावांसह अतोनात हाल काढले होते. तिघेही भाऊ तुरुंगात असताना त्यांनी कविता केली, की माझ्या आईला ७ मुले असती तर तीही भारतमातेच्या बेड्या तोडण्यासाठी धावून आली असती. आणि त्यांनी लिहिलेल्या पत्रानंतरही त्यांना काही वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. पुढे सरकारने त्यांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध ठेवले. अखेर १९३७ साली त्यांच्यावरची बंदी उठविण्यात आली. अशा व्यक्तीच्या पत्रातील शब्दांबाबत आज विचार करताना सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली असा आजच्या परिभाषेत गहजब करणे गैर आहे.
मला मात्र या आरोपांचे विशेष आश्चर्य वाटले नाही. कॉ. सोमनाथ चटर्जी यांच्या पूर्वसुरींनी (कॉ. बी. टी. रणदिवे यांनी) भारतीय कम्युनिस्ट चळवळीतील एक अग्रणी कॉ. एस. ए. डांगे यांचेवरही ते ब्रिटिशांचे हस्तक होते, असा आरोप जाहीरपणे केला होता. १९३६ साली फैजपूर काँग्रेसमध्ये हा आरोप असलेली हजारो पत्रके वाटण्यात आली होती.
स्वा. सावरकर यांचेवर दुसरा आरोप म्हणजे द्विराष्ट्रवादाच्या मांडणीबद्दलचा. ही गोष्ट खरीच आहे आणि त्याबद्दल सावरकरांशी उभा दावा मांडायला हवा. सावरकरांचे तैलचित्र लावायला हवे, असे म्हणणे म्हणजे त्यांची राजकीय प्रणाली मान्य होणे, असा अर्थातच नाही, हे पुन्हा एकदा नमूद करतो. सावरकरांच्या चरित्राचे सरळच दोन भाग पडतात. १८५७ च्या उठावाचे पुस्तक लिहून त्यावेळी झालेल्या हिंदू-मुस्लिम एकजुटीची मुक्त स्तुती करणारे, ‘अभिनव भारत’ सारखी क्रांतिकारक संघटना उभारणारे, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ अशा आर्त आर्जवाने तरुणांमध्ये प्रखर राष्ट्रवाद चेतविणारे, कळीकाळाला धक्के देण्याचे धारिष्ट्य दाखविणारे असे राजकीय क्रांतिकारक व त्याचबरोबर सामाजिक बाबतीत, विज्ञान हे शाप नसून वरदान आहे, हे सांगणारे, धर्ममार्तंडांचा रोष पत्करुन, ‘गाय ही माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे, तर एक उपयुक्त पशू आहे’ असा लेख लिहिणारे, त्याचबरोबर जातिभेद नष्ट झाले पाहिजेत, असे सांगून रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात सर्व जातींना खुले असलेले मंदिर उभारणारे हा एक भाग आहे.
आणि दुसरा भाग आहे तो १९३७ नंतरचा. हे सावरकर आहेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडून, हिंदू महासभेचे अध्यक्ष बनून द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडणारे, मुस्लिम द्वेष पसरविणारे. पहिल्या भागाबद्दल कृतज्ञता व आत्मीयता आणि दुसऱ्या भागावरती स्वाभाविक कडाडून टीका अशीच त्याबद्दल कोणाही राष्ट्रप्रेमीची भावना असली पाहिजे. जाता-जाता सहज लक्षात ठेवावे की, बॅ. जीनांचा प्रवासही नेमका असाच झाला. (हे असे का झाले, हा एक स्वतंत्र विषय आहे.) असो.
या संदर्भातील जुनी घटना इथे सांगणे संयुक्तिक वाटते. १९३७ साली सावरकर सुटले. पुणेकर विद्यार्थ्यांतर्फे त्यांचा सत्कार करण्याचे ठरले. पुणे विद्यार्थी संघाने त्यावेळी स्पष्ट अशी भूमिका घेतली की, सावरकरांना द्यायच्या मानपत्रात त्यांच्या पहिल्या व्यवहाराबद्दल पूर्ण कृतज्ञता व्यक्त करुन नंतर घेतलेल्या भूमिकेबाबत नापसंती व्यक्त करायची. संघ परिवाराचा ह्याला उघड विरोध होता. त्यामुळे पुण्यात त्यांचे दोन सत्कार झाले. असे सटीक मानपत्र देणार आहे, असे माहीत असूनही सावरकर पुणे विद्यार्थी संघाच्या सत्काराला हजर राहिले, त्यांनी मानपत्र किंचित रागाने पण स्वीकारले. पुणे विद्यार्थी संघाचा जनरल सेक्रेटरी या नात्याने मी तो ठराव मांडला व कै. माधव लिमये यांनी त्यास अनुमोदन दिले होते. पुढे काही दिवसांनी सेनापती बापट यांच्या संदर्भात रा. स्व. संघाने जे उद्गार काढले त्यावरुन पुणे शहरात मारामारी झाली. त्यात सावरकरांच्या विरोधी गटातील एक सक्रीय भागीदारही मी होतो.
सावरकरांनी द्विराष्ट्राला पाठिंबा दिला, हे खरेच. देशाची फाळणी होण्यात या सिद्धांताचा बराच हातभार लागला आहे, हे सत्य आहेच. पण त्यांच्यावर याबाबतीत टीका करणाऱ्या कॉ. सोमनाथ चटर्जी यांनी हे लक्षात ठेवावे की, १९४२ साली कम्युनिस्ट पक्षाने पाकिस्तान निर्मितीला पाठिंबा दिला होता, त्या मागणीला तात्त्विक अधिष्ठान दिले होते. ह्याची आठवण माझ्यासारख्या जुन्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याला होणे स्वाभाविक आहे. १९४२ सालच्या आंदोलनात काही जणांना कम्युनिस्ट पक्षातून काढण्यात आले होते. त्यामागच्या अनेक कारणांमध्ये त्यांचा ४२ च्या आंदोलनातील सक्रीय सहभाग व पाकिस्तान निर्मितीला विरोध ही दोन कारणे होती.
तैलचित्र प्रकरणाबाबत एका गोष्टीचा मला विशेष खेद होतो. सोनिया गांधी व काँग्रेस यांनी या गोष्टीला हातभार लावला. इतिहास सोयीनुसार पुसणे ही काँग्रेसची परंपरा नाही; ती यावेळी डागाळली गेली याचे वाईट वाटते. तैलचित्र आता लागले आहेच, पण या निमित्ताने काही मुद्दे समोर आले. शेवट करताना दोन गोष्टी सांगायला हव्यात. अशा बाबतीत निसरडा व्यवहार झाल्यास त्याचा फायदा कुणाला मिळतो? लोकशाही, सर्वधर्म समभाव, जागतिक शांतता ह्याऐवजी अमेरिकी धार्जिणे धोरणाकडे देशाला नेणाऱ्या धर्मांध शक्तींनाच मिळतो. दुसरे म्हणजे लोकशाहीत विरोधक म्हणजेच शत्रू आणि मग त्यांनी केलेले कुठलेही समाजोपयोगी योगदान नाकारायचे ह्याबद्दल मूळापासून विचार सर्वांनी करणे ही काळाची गरज आहे.
- भाऊ फाटक

Friday, August 14, 2015

फाशीविषयी बाबासाहेबांचे मत

Speaking before the Constituent Assembly of India on 3rd June, 1949, the architect of India’s constitution, Dr. Ambedkar, pointed out,


“… I would much rather support the abolition of death sentence itself. That I think is the proper course to follow, so that it will end this controversy. After all this country by and large believes in the principles of non-violence, It has been its ancient tradition, and although people may not be following in actual practice, they certainly adhere to the principle of non-violence as a moral mandate which they ought to observe as dar as they possibly can and I think that having regard to this fact, the proper thing for this county to do is to abolish the death sentence altogether”.

Tuesday, August 4, 2015

सबकुछ आंबेडकर!

...दलितांची मने बुद्ध आणि आंबेडकरांच्या केवळ नावांनी इतकी ग्रासून गेली आहेत की त्यापलीकडे काही विचार, तत्त्वचिंतन आहे असे ते मानीतच नाहीत. सबकुछ आंबेडकर! त्यांच्यापलीकडे कोणी नेता नाही आणि विचारही नाही. त्यांना समजलेला किंवा न समजलेला आंबेडकर त्यांच्या दृष्टीने जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती आणि त्यांनी व्यक्त केलेले विचारच सर्वश्रेष्ठ आहेत. त्यात काहीही बदल नको. त्यांचा विकास तर अजिबात नको. मुसलमानी तालिबानींना मुहम्मदासोबत इतर कुणाचे नाव घेतले तर त्यांची जशी तळपायाची आग मस्तकात शिरते, तशीच भावना दलितांची होताना दिसते आहे.
- डॉ. रावसाहेब कसबे (परिवर्तनाचा वाटसरु, जुलै २०१५, पा. क्र. २९)

Wednesday, June 25, 2014

Reservations in India: Myths and Realities By Mulchand Savajibhai Rana

http://books.google.co.in/books?id=NN8VJ41kFO0C&lpg=PP1&pg=PA199#v=onepage&q&f=false

Thursday, June 5, 2014

UNPUBLISHED PREFACE to Buddha and His Dhamma

UNPUBLISHEDPREFACE
April 6, 1956
[Text provided by Eleanor Zelliot, as prepared by Vasant Moon]

A question is always asked to me: how I happen[ed] to take such [a] high degree of education. Another question is being asked: why I am inclined towards Buddhism. These questions are asked because I was born in a community known in India as the "Untouchables." This preface is not the place for answering the first question. But this preface may be the place for answering the second question.
The direct answer to this question is that I regard the Buddha's Dhamma to be the best. No religion can be compared to it. If a modern man who knws science must have a religion, the only religion he can have is the Religion of the Buddha. This conviction has grown in me after thirty-five years of close study of all religions.
How I was led to study Buddhism is another story. It may be interesting for the reader to know. This is how it happened.
My father was a military officer, but at the same time a very religious person. He brought me up under a strict discipline. From my early age I found certain contradictions in my father's religious way of life. He was a Kabirpanthi, though his father was Ramanandi. As such, he did not believe in Murti Puja (Idol Worship), and yet he performed Ganapati Puja--of course for our sake, but I did not like it. He read the books of his Panth. At the same time, he compelled me and my elder brother to read every day before going to bed a portion of [the] Mahabharata and Ramayana to my sisters and other persons who assembled at my father's house to hear the Katha. This went on for a long number of years.
The year I passed the English Fourth Standard Examination, my community people wanted to celebrate the occasion by holding a public meeting to congratulate me. Compared to the state of education in other communities, this was hardly an occasion for celebration. But it was felt by the organisers that I was the first boy in my community to reach this stage; they thought that I had reached a great height. They went to my father to ask for his permission. My father flatly refused, saying that such a thing would inflate the boy's head; after all, he has only passed an examination and done nothing more. Those who wanted to celebrate the event were greatly disappointed. They, however, did not give way. They went to Dada Keluskar, a personal friend of my father, and asked him to intervene. He agreed. After a little argumentation, my father yielded, and the meeting was held. Dada Keluskar presided. He was a literary person of his time. At the end of his address he gave me as a gift a copy of his book on the life of the Buddha, which he had written for the Baroda Sayajirao Oriental Series. I read the book with great interest, and was greatly impressed and moved by it.
I began to ask why my father did not introduce us to the Buddhist literature. After this, I was determined to ask my father this question. One day I did. I asked my father why he insisted upon our reading theMahabharata and Ramayana, which recounted the greatness of the Brahmins and the Kshatriyas and repeated the stories of the degradation of the Shudras and the Untouchables. My father did not like the question. He merely said, "You must not ask such silly questions. You are only boys; you must do as you are told." My father was a Roman Patriarch, and exercised most extensive Patria Pretestas over his children. I alone could take a little liberty with him, and that was because my mother had died in my childhood, leaving me to the care of my auntie.
So after some time, I asked again the same question. This time my father had evidently prepared himself for a reply. He said, "The reason why I ask you to read the Mahabharata and Ramayana is this: we belong to the Untouchables, and you are likely to develop an inferiority complex, which is natural. The value of [the] Mahabharata and Ramayana lies in removing this inferiority complex. See Drona and Karna--they were small men, but to what heights they rose! Look at Valmiki--he was a Koli, but he became the author of [the] Ramayana. It is for removing this inferiority complex that I ask you to read theMahabharata and Ramayana."
I could see that there was some force in my father's argument. But I was not satisfied. I told my father that I did not like any of the figures in [the] Mahabharata. I said, "I do not like Bhishma and Drona, nor Krishna. Bhishma and Drona were hypocrites. They said one thing and did quite the opposite. Krishna believed in fraud. His life is nothing but a series of frauds. Equal dislike I have for Rama. Examine his conduct in the Sarupnakha [=Shurpanakha] episode [and]  in the Vali Sugriva episode, and his beastly behaviour towards Sita." My father was silent, and made no reply. He knew that there was a revolt.
This is how I turned to the Buddha, with the help of the book given to me by Dada Keluskar. It was not with an empty mind that I went to the Buddha at that early age. I had a background, and in reading the Buddhist Lore I could always compare and contrast. This is the origin of my interest in the Buddha and His Dhamma.
The urge to write this book has a different origin. In 1951 the Editor of the Mahabodhi Society's Journal of Calcutta asked me to write an article for the Vaishak Number. In that article I argued that the Buddha's Religion was the only religion which a society awakened by science could accept, and without which it would perish. I also pointed out that for the modern world Buddhism was the only religion which it must have to save itself. That Buddhism makes [a] slow advance is due to the fact that its literature is so vast that no one can read the whole of it. That it has no such thing as a bible, as the Christians have, is its greatest handicap. On the publication of this article, I received many calls, written and oral, to write such a book. It is in response to these calls that I have undertaken the task.
To disarm all criticism I would like to make it clear that I claim no originality for the book. It is a compilation and assembly plant. The material has been gathered from various books. I would particularly like to mention Ashvaghosha's Buddhavita [=Buddhacharita], whose poetry no one can excel. In the narrative of certain events I have even borrowed his language.
The only originality that I can claim in [=is] the order of presentation of the topics, in which I have tried to introduce simplicity and clarity. There are certain matters which give headache[s] to the student of Buddhism. I have dealt with them in the Introduction.
It remains for me to express my gratitude to those who have been helpful to me. I am very grateful to Mr. Nanak Chand Rattua of Village Sakrulli and Mr. Parkash Chand of Village Nangal Khurd in the district of Hoshiarpur (Punjab) for the burden they have taken upon themselves to type out the manuscript. They have done it several times. Shri Nanak Chand Rattu took special pains and put in very hard labour in accomplishing this great task. He did the whole work of typing etc. very willingly and without caring for his health and [=or] any sort of remuneration. Both Mr. Nanak Chand Rattu and Mr. Parkash Chand did their job as a token of their greatest love and affection towards me. Their labours can hardly be repaid. I am very much grateful to them.
When I took up the task of composing the book I was ill, and [I] am still ill. During these five years there were many ups and downs in my health. At some stages my condition had become so critical that doctors talked of me as a dying flame. The successful rekindling of this dying flame is due to the medical skill of my wife and Dr. Malvankar. They alone have helped me to complete the work. I am also thankful to Mr. M. B. Chitnis, who took [a] special interest in correcting [the] proof and to go [=in going] through the whole book.
I may mention that this is one of the three books which will form a set for the proper understanding of Buddhism. The other books are: (i) Buddha and Karl Marx; and (ii) Revolution and Counter-Revolution in Ancient India. They are written out in parts. I hope to publish them soon.
B. R. Ambedkar
26 Alipur Road, Delhi
6-4-56

Source; http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_buddha/00_pref_unpub.html

Wednesday, May 28, 2014

सार्वजनिक संस्थांच्या निधीविषयी महात्मा गांधींचे विचार

अनेक सार्वजनिक संस्था सुरु करुन त्यांची व्यवस्था चालविण्याच्या जबाबदारीचा अनुभव घेतल्यानंतरच मी अशा दृढ निर्णयावर आलो, की कोणत्याही सार्वजनिक संस्थेने कायम फंडावर गुजारा करण्याचा प्रयत्न करु नये. तसे करण्यामध्ये तिच्या नैतिक अधोगतीचे बीज साठविलेले आहे. 

सार्वजनिक संस्था म्हणजे लोकांची मान्यता आणि लोकांचे पैसे यांवर चालणारी संस्था. अशा संस्थेला लोकांची मदत मिळेनाशी होईल तेव्हा तिला अस्तित्वात राहण्याचा हक्कच राहत नाही. कायम फंडावर चालणाऱया संस्था लोकमताविषयी बेपर्वा होताना आढळतात; कित्येक वेळा तर धडधडीत लोकमताविरुद्ध आचरण करताना दृष्टीस पडतात. अशा तऱहेचे अनुभव हिंदुस्थानात आपल्याला पावलोपावली येतात. धार्मिक म्हटल्या जाणाऱया कित्येक संस्थांच्या हिशेबठिशेबांचा ठावठिकाणा नाही. त्यांचे व्यवस्थापक त्यांचे मालक होऊन बसले आहेत, आणि त्यांच्यावर कोणाचा ताबा चालत नाही. सृष्टी ज्याप्रमाणे रोजचे अन्न रोज तयार करुन रोज खाते, त्याप्रमाणे सार्वजनिक संस्थांचे असले पाहिजे, याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. ज्या संस्थेला लोक मदत करण्यास तयार नाहीत त्या संस्थेला सार्वजनिक संस्था म्हणून जगण्याचा अधिकारच नाही. प्रतिवर्षी लोकवर्गणीतून मिळणारा फंड ही त्या त्या संस्थेच्या लोकप्रियतेची व तिच्या व्यवस्थापकांच्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे; आणि प्रत्येक संस्थेने या कसोटीला उतरलेच पाहिजे, असा माझा अभिप्राय आहे. 

या माझ्या लिहिण्याविषयी गैरसमज होऊ नये. ज्या संस्थांना इमल्याची वगैरे जरुर लागते, अशा संस्थांना वरील टीका लागू पडत नाही. सार्वजनिक संस्थांच्या दैनंदिन खर्चाचा आधार स्वेच्छेने मिळालेली वार्षिक लोकवर्गणी हाच असला पाहिजे. 

हे विचार दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाच्या वेळी दृढ झाले. ह्या सहा वर्षांच्या महान झगड्यासाठी लाखो रुपयांची जरुर पडली, पण तो कायमनिधीशिवाय चालला. अशीही वेळ आठवते, की जेव्हा उद्याचा खर्च कोठून मिळेल याची मला कल्पनाही नव्हती. 

(स्रोत ः सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा, महात्मा गांधी, पान 187-188)

Mahatma
Gandhi on FUNDING for movement

Sheth
Adamji Miyakhan had, in my absence, discharged his duty with great
credit. He had increased the membership and added about £1,000
to the coffers of the Natal Indian Congress. The awakening caused by
the bills and the demonstration against the passengers I turned to
good account by making an appeal for membership and funds, which now
amounted to £5,000. My desire was to secure for the Congress a
permanent fund, so that it might procure property of its own and then
carry on its work out of the rent of the property. This was my first
experience of managing a public institution. I placed my proposal
before my co- workers, and they welcomed it. The property that was
purchased was leased out and the rent was enough to meet the current
expenses of the Congress. The property was vested in a strong body of
trustees and is still there today, but it has become the source of
much internecine quarrelling with the result that the rent of the
property now accumulates in the court.

This
sad situation developed after my departure from South Africa, but my
idea of having permanent funds for public institutions underwent a
change long before this difference arose. And now after considerable
experience with the many public institutions which I have managed, it
has become my firm conviction that it is not good to run public
institutions on permanent funds. A permanent fund carries in itself
the seed of the moral fall of the institution. A public institution
means an institution conducted with the approval, and from the funds,
of the public. When such an institution ceases to have public
support, it forfeits its right to exist. Institutions maintained on
permanent funds are often found to ignore public opinion, and are
frequently responsible for acts contrary to it. In our country we
experience this at every step. Some of the so-called religious trusts
have ceased to render any accounts. The trustees have become the
owners and are responsible to none. I have no doubt that the ideal is
for public institutions to live, like nature, from day to day. The
institution that fails to win public support has no right to exist as
such. The subscriptions that an institution annually receives are a
test of its popularity and the honesty of its management; and I am of
opinion that every institution should submit to that test. But let no
one misunderstand me. My remarks do not apply to the bodies which
cannot, by their very nature, be conducted without permanent
buildings. What I mean to say is that the current expenditure should
be found from subscriptions voluntarily received from year to year.

These
views were confirmed during the days of the Satyagraha in South
Africa. That magnificent campaign extending over six years was
carried on without permanent funds, though lakhs of rupees were
necessary for it. I can recollect times when I did not know what
would happen the next day if no subscriptions came in. But I shall
not anticipate future events. The reader will find the opinion
expressed above amply borne out in the coming narrative.



(Source
An
Autobiography or The Story of my Experiments with Truth
 by Mohandas
K. Gandhi
 part 3,
The Calm After the Storm)


माझ्या माणसांनो



माझ्या माणसांनो,

तुम्ही काळे असाल, गोरे असाल, लाल किंवा पिवळे असाल,

कोणत्याही जातीचे, धर्माचे, देशाचे, भाषेचे असाल...

पण गर्भारपणी तुमच्या आयांच्या डोळ्यांत

सारख्याच स्वप्नांची निरांजने तेवली असतील.

प्रसुतीच्या असह्य वेणा त्यांनी

सारख्याच आशेने सहन केल्या असतील...

तुमचा बाप माझ्यासारखाच

काहीसा केविलवाणा, थोडा ओशाळवाणा,

तुमची वाट बघत बसला असेल...


तुम्ही काळे, गोरे, लाल, पिवळे असतानाही

कुठल्याही धर्माचे, देशाचे, भाषेचे असतानाही

जर सारखेच गरीब असाल, तर-

तुमच्या आईने कोरडा घास

तुम्हाला आसवांत भिजवून भरवला असेल.

पाठीवर हात फिरवताना,

बापाच्या गळ्यात आवंढा आला असेल.

तुम्हालाही माझ्यासारखंच...

खेळण्याबागडण्याचे वय संपायच्या अगोदरच

पोटाची खळगी भरण्याकरिता

बाहेर पडावं लागलं असेल.


केवळ तुम्ही कोण्या जातीचे, धर्माचे, वर्णाचे

किंवा देशाचे, प्रांताचे आहात

एवढ्याकरिता-

खोट्या आणि करंट्या अहंकाराचे बळी झाला असाल

तर तुम्हीही माझ्यासारखाच

एकमेकांचा द्वेष केला असेल.

नराधम नेत्यांच्या घोषणांनी उत्तेजित होऊन

एकमेकांची कत्तलही केली असेल.

भेकडपणाला शौर्य समजून

आपल्या सैतानी चिन्हांच्या नावाने

जयघोषही केला असेल!


माझ्या माणसांनो,

जन्माला आलात ना

तेव्हा कुणाच्याच छातीवर जानवे नव्हते.

कुणाच्याच मनगटात कडे नव्हते.

कुणालाच बाप्तिस्मा दिलेला नव्हता.

कुणाचीच सुन्ता केलेली नव्हती.

कुणाच्याच बगलेत पैशाच्या पिशव्या नव्हत्या.

कुणाच्याच काखेत भिकेची झोळी नव्हती.

जन्माला येताना – तुम्ही केलेल्या आकांताची

भाषा तर एकच होती...!


माझ्या माणसांनो,

जात, धर्म, भाषा, भेद विसरुन

जेव्हा तुम्ही प्रगतीची वाटचाल करत असाल

तेव्हा तुम्हाला भेटतील-मलाही भेटलेल्या त्याच शक्ती...

परंपरांची झूल पांघरणाऱ्या

भेदभावांची भूल घालणाऱ्या

अहंकारांचे निखारे फुलविणाऱ्या.

आणि तुम्ही जर सावध नसाल

तर शत्रुऐवजी एकमेकांचीच कत्तल कराल.


माझ्या माणसांनो,

विचारशक्तीला रजा देऊ नका.

संस्कारांचे गुलाम होऊ नका.

तुमच्यातील माणसाचा खून

सैतानालाच काय-पण तुमच्या देवालाही करु देऊ नका!

-जयंत गडकरी